इ.10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी
मोठी बातमी ! परीक्षा केंद्रावर उशिरा
आल्यास प्रवेश मिळणार नाही
SSC HSC Board Exam Maharashtra
Board Exam :- दहावी बारावी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली असून, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे.
पहा सविस्तर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा दिनांक 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार, सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता अशी पेपरची वेळ आहे
तसेच आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती, परंतु राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहे -
तसेच परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
आपली प्रतिक्रिया व सूचना