स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत
हर घर तिरंगा उपक्रम
दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
दरम्यान राबविले जाणार
आज़दी का अमृत महोत्सव :- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" या उपक्रमाच्या - अंमलबजावणीबाबतउपरोक्त विषयान्वये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी With तिरंगा अपलोड केले होते.
त्याचप्रमाणे याही वर्षी म्हणजेच दिनांक १३/०८/२०२३ ते दिनांक १५/०८/२०२३ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे.
सदर उपक्रमाचे उद्देश स्वातंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाने गाठलेले प्रगतीचे टप्पे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे, आणि भारत देश घडविणाऱ्या महान व्यक्तींची आठवण करणे असे आहेत.
सब त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा क्षण प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच जारतीय जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत, याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत प्राचार्यानी सूचित करावे.
तसेच जिल्ह्यातील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल विभागाने यापूर्वी दिलेल्या https://termsgle/mTRqVQCr PUq3fxw
या लिंकवर सादर करावा, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
आपली प्रतिक्रिया व सूचना