HSC Exam Maharashtra Board Result New Updates

इ. बारावीचा निकाल आज जाहीर होणार

दिनांक 3 ऑगस्ट ला 4 वाजता

इ. बारावी परीक्षा बैठक क्रमांक शोधा

Maharashtra Education

इ. बारावी परीक्षा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून  जाहीर करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ बी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

Maharashtra HSC Result 2021

निकाल खालील वेबसाईटवर पहा

Website                                                        Website                                                      Website

                Website

खालील संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. 

                 Website

इ. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. 

 खालील वेबसाईटच्या Link  वर क्लिक करून Seat क्रमांक मिळवू शकतात.

           https://mh-hsc.ac.in/    

आपला बैठक क्रमांक प्राप्त करण्यासाठी आपला जिल्हा, तालुक्याची निवड करावी,  

त्यानंतर आवेदनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव प्रविष्ठ करावे व Search बटणावर क्लिक करावे. दिलेल्या माहितीच्या आधारे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.


 सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे

 सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१० श्री मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.११ च्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा सराव परीक्षा सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ. १२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक / अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ. १२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

 दिनांक २ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक / दोन संधी उपलब्ध राहतील.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad