दहावी-बारावीच्या निकालाबाबत
मोठी बातमी ! दिनांक १०
जून पूर्वी जाहीर होणार
SSC HSC Board Exam Maharashtra Results
दिनांक 25 मे 2023 रोजी दोन वाजता बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे. आता फक्त आतुरता आहे ती म्हणजे दहावीच्या निकालाची तर सूत्रांच्या व विविध माध्यमाच्या माहितीनुसार दहावीचा रिझल्ट हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे
दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरु असून 90 टक्के कामकाज पूर्ण झाले आहे.
पहिल्यांदा बारावीचा निकाल दिनांक २५ मे रोजी जाहीर झालेला आहे
तर दहावीचा निकाल दिनांक 10 जूनपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून नियोजन सुरु आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती.
बारावीचा निकाल 'या' दिवशी, दहावीचा निकाल १० जून पूर्वी
दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरु असून ९० टक्के कामकाज पूर्ण झाले आहे.
पहिल्यांदा बारावीचा निकाल दिनांक २५ मे रोजी जाहीर झालेला आहे.
तर दहावीचा निकाल दिनांक १० जूनपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून नियोजन सुरु आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी 'नांदेड पॅटर्न' राबविला.
त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे.
सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्यावर आता निकालाची तयारी सुरु झाली आहे.
बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक ९० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दहावी-बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी विलंब होणार नाही, याची खबरदारी बोर्डाकडून घेतली जात आहे. त्याअनुषंगाने निकाल वेळेत लागावेत, असे नियोजनही बोर्डाने केले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
मे अखेरीस निकाल जाहीर न झाल्यास दिनांक २५ मे रोजी तो निकाल लागेल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर सहा ते आठ दिवसांत म्हणजेच दिनांक १० जूनपर्यंत दहावीचा निकाल लागावा, अशीही तयारी झाली आहे.
निकालानंतर प्रवेश प्रक्रिया
यंदापासून नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे. त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरु झाली आहे.
बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे. साधारणत: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत बोर्डाने आता निकालाची तयारी युद्धपातळीवर सुरु केल्याचेही सांगण्यात आले
आपली प्रतिक्रिया व सूचना