सन २०२२-२३ या आर्थिक वर्षी दिनांक ३० जून २०२२ पर्यंत कोणत्याही बदल्या न करणेबाबत! शासन निर्णय
शासन परिपत्रक
शासनाच्या निदेशानुसार, "महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ नुसार करण्यात येणाऱ्या बदल्या सन २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षी दिनांक ३० जून, २०२२ पर्यंत करण्यात येऊ नयेत , असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
तथापि, प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास, अशी बदली मा. मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेने करावी असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०५२७१६०६५३१००७ असा आहे.
शासन परिपत्रक डाऊनलोड
आपली प्रतिक्रिया व सूचना